कोरोनाने घेतला महाराष्ट्रातील पहिला बळी


मुंबई : कोरोनाने महाराष्ट्रातील पहिला बळी घेतला असून कस्तुरबा रुग्णालयातील कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला आहे. या रुग्णाला हिंदुजा रुग्णालयातून कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण या रुग्णाचा आज मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे ६४ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. देशभरात आतापर्यंत ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कर्नाटक, दिल्लीनंतर मुंबईत कोरोनाचा तिसरा बळी गेला आहे. मुंबईत पहिला बळी गेल्याने आता महाराष्ट्रातील जनतेला आता आणखी काळजी घेण्याची गरज आहे. देशात कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत.

Leave a Comment