प्रेक्षकांविना होणार दक्षिण आफ्रिकाविरोधातील मालिका


मुंबई – पावसामुळे काल भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना रद्द करण्यात आला असून . काल सकाळपासून धर्मशाळामध्ये पावसाने हजेरी लावल्यामुळे बीसीसीआयने संध्याकाळी साडेपाच वाजता सामना रद्द करण्यात आल्याची घोषणा केली. १५ मार्चला लखनौ येथे मालिकेतील दुसरा सामना होईल. त्यानंतर १८ मार्चला कोलकाता येथे अखेरचा सामना होणार आहे.

पण, कोरोनाच्या धोक्यामुळे या मालिकेतील उर्वरित सामन्यात प्रेक्षकांना मैदानात प्रवेश दिला जाणार नसल्याची माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, कोलकाताच्या सामन्याची तिकीट विक्री बंद करण्यात आली आहे.

क्रीडा मंत्रालयाने एखादी क्रीडा स्पर्धा कोरोनाच्या धोक्यामुळे पुढे ढकलणे शक्य नसेल, तर प्रेक्षकांशिवाय ती स्पर्धा घ्यावी, असा सल्ला दिल्यामुळे प्रेक्षकांविनाच भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेचे पुढील दोन सामने खेळवण्यात येतील, अशी शक्यता आहे. जर असे झाल्यास क्रिकेटच्या इतिहासात हा प्रेक्षकांविना झालेला पहिला सामना ठरेल.

Leave a Comment