केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ


नवी दिल्ली – केंद्रीय मंत्रिमंडळाने आज कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ चार टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. अनेक विषयांवर यावेळी चर्चा झाली. देशासमोर उद्भवलेल्या आर्थिक आणि कोरोनाच्या संकटावर मात करण्याबद्दल चर्चा झाली. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णयाला यावेळी मंजुरी देण्यात आली.

सरकारने यापूर्वी ऑक्टोबर २०१९ मध्ये महागाई भत्त्यात वाढ केली होती. त्यावेळी केंद्राने महागाई भत्त्यात ५ टक्के वाढ करण्यात आली होती. ५० लाख वेतनधारक कर्मचारी आणि ६२ पेन्शनधारकाना या निर्णयामुळे लाभ झाला. तर तब्बल १६ हजार कोटी रूपयांचा बोजा सरकारी तिजोरीवर पडला होता. चार टक्के वाढ करण्यात आल्यामुळे भत्ता २१ टक्के झाला आहे.

Leave a Comment