दर दहा वर्षांनी बाप बदलण्याची आम्हाला सवय नाही


नवी मुंबई – भाजप नेते आणि आमदार गणेश नाईक यांना प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दर दहा वर्षांनी आम्हाला बाप बदलण्याची सवय नसल्याचे म्हणत बोचरी टीका केली आहे. जितेंद्र आव्हाड आणि गणेश नाईक यांच्यात गेल्या काही दिवसांपासून शाब्दिक युद्ध रंगले आहे. जितेंद्र आव्हाड यांना “ये तेरे बस की बात नहीं, तेरे बाप को बोल और नाम पुछे तो बोल गणेश नाईक” अशा फिल्मी स्टाइलमध्ये गणेश नाईक यांनी उत्तर दिले होते. त्यावर आता उत्तर देत दर दहा वर्षांनी आम्हाला बाप बदलण्याची सवय नसल्याचे प्रत्युत्तर जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले की, एकदा नवी मुंबईत मी गेलो तर गणेश नाईकांनी कथकल्लीच सुरु केली आहे. मी अजून शंभरवेळा जाणार आहे. त्यानंतर माझा बापदेखील येईल. दर दहा वर्षांनी बाप बदलण्याची मला सवय नाही. जितेंद्र आव्हाड यांनी गणेश नाईक यांच्या फिल्मी स्टाइल टीकेला उत्तर देताना, मी स्वतःचे डायलॉग स्वत: मारतो. मी स्वत: स्क्रिप्ट लिहितो, स्वत: डायलॉग मारतो आणि स्वत:च्या आवाजात मारतो, असे त्यांनी म्हटले आहे.

Leave a Comment