यामुळे आजवर कुणी सर करु शकला नाही कैलास पर्वत


कैलास पर्वताला हिंदू धर्मियांमध्ये खूप महत्वाचे स्थान आहे. कारण कैलास पर्वतावर देवाधिदेव भगवान शंकर यांचे वास्तव असल्याची मान्यता आहे. पण या पर्वताबाबत आणखी एक विशेष बाब अशी आहे की आतापर्यंत ७ हजारपेक्षा अधिक लोकांनी जगातील सर्वात उंच माउंट एव्हरेस्ट पदक्रांत केले आहे. तर माऊंट एव्हरेस्ट उंची ८८४८ एवढी आहे. पण आजवर कोणीही कैलास पर्वत सर करू शकलेले नाही. त्यातच त्याची उंची उंची ६६३८ मीटर एवढी असून देखील कैलास पर्वत कुणी सर केला नाही, हे एक प्रकारचे कोडेच आहे.

अनेक कथा कैलास पर्वतावर कधी कुणीही चढाई न करण्यावरून प्रचलित आहेत. याबाबत काही लोकांचे असे म्हणने आहे की, भगवान शिव कैलास पर्वतावर राहतात आणि त्यामुळे येथे कोणतीही जिवंत व्यक्ती जाऊ शकत नाही. त्याचबरोबर याबाबत अशी देखील मान्यता आहे की, कोणतीही व्यक्ती कैलाश पर्वतावर थोडे वर दिशाहीन होते. दिशा कळत नसताना चढाई करणे मरणाला निमंत्रण देण्यासारखेच असल्यामुळेच कैलास पर्वतावर आजपर्यंत कुणी चढू शकले नाही.

याबाबत इतर माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनुसार एका गिर्यारोहकाने आपल्या असे पुस्तकात लिहिले होते की, कैलास पर्वतावर चढण्याचा त्याने प्रयत्न केला होता. पण या पर्वतावर राहणे अशक्य होते. कारण तेथे शरीरावरील केस आणि नखे वेगाने वाढू लागतात. त्यासोबतच कैलास पर्वतावर फार जास्त रेडिओअॅक्टिवही आहे. त्यासोबतच असेही म्हटले जाते की, ६५ डिग्रीपेक्षा जास्त कैलास पर्वताचा स्लोप सुद्धा आहे. हाच माउंट एव्हरेस्टचा स्लोप ४०-६० असा आहे. हेच कारण आहे की, गिर्यारोहक माउंट एव्हरेस्टवर सहजपणे चढाई करू शकतात, पण कैलास पर्वतावर करू शकत नाहीत.

याबाबत रशियातील एक गिर्यारोहक सरगे सिस्टीयाकोव हे सांगतात की, कैलास पर्वताच्याजवळ जेव्हा मी गेलो तेव्हा माझे हृदय वेगाने धडधडत होते. त्या पर्वताच्या मी अगदी समोर होतो, आजपर्यंत ज्यावर कुणीही चढाई करू शकले नाहीत. पण मला अचानक कमजोरी वाटू लागली आणि माझ्या मनात विचार आला की, मी येथे थांबू नये. त्यानंतर जसजसा मी खाली उतरत गेलो, माझे मन हलके होत गेले.

जवळपास १८ वर्षांआधी म्हणजे २००१ मध्ये कैलास पर्वतावर चढाई करण्याचा शेवटचा प्रयत्न केला गेला होता. तेव्हा स्पेनच्या एका टीमला चीनने कैलास पर्वतावर चढाई करण्याची परवानगी दिली होती. कैलास पर्वतावर चढाई करण्यावर सध्या पूर्णपणे बंदी आहे. कारण भारत आणि तिबेटसहीत जगभरातील लोकांचे मत आहे की, हे एक पवित्र ठिकाण आहे. त्यामुळे यावर कुणालाही चढाई करू देऊ नये.

Leave a Comment