आव्हाडांच्या खंडणीखोर वक्तव्याला गणेश नाईकांचे प्रत्युत्तर


नवी मुंबई – गृहनिर्माण मंत्री आरोप जितेंद्र आव्हाडांनी एका जाहिर सभेला संबोधित करताना गणेश नाईक हे खंडणीखोर आहेत, नवी मुंबईचे डॉन असल्याचा गंभीर आरोप केला होता. गणेश नाईकांनी आव्हाडांच्या या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. गणेश नाईकांनी ‘ये तेरे बस की बात नही… तेरे बाप को बोल, असे म्हणत टोला लगावला आहे.

गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि भाजप नेते गणेश नाईक यांच्यात महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गणेश नाईक हे नवी मुंबईतील सर्वात मोठे खंडणीखोर असल्याची घणाघाती टीका केली होती.

जितेंद्र आव्हाड म्हणाले होते की, नवी मुंबईतील इमारती, कारखाने, दगडखाणी आणि इतर कंत्राटे कोणाकडे आहेत? खंडणी आणि धमकीच्याबाबतीत नवी मुंबईत गणेश नाईक यांचाच शब्द चालतो. नाईकांची ही सल्तनत नेस्तनाबूत करा, असे आवाहनही आव्हाड यांनी केले होते. दरम्यान, येत्या एप्रिल महिन्यात नवी मुंबई महापालिकेची निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून नवी मुंबईत जोरदार तयारी सुरु आहे.

Leave a Comment