मराठी कलाकारांनीही घेतला रंगपंचमी साजरी न करण्याचा निर्णय


चीनमध्ये उगम झालेल्या कोरोना व्हायरसची दहशत सध्या जगभरात पाहायला मिळत आहे. त्यापार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी जाणे लोकांना टाळावे असे आवाहन विविध आरोग्य संघटनांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. त्यातच काल आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रंगपंचमी साजरी न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर हिंदी सिनेसृष्टी पाठोपाठ आता मराठी कलाकारांनी रंगपंचमी साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनाचा एकही संशयित रुग्ण महाराष्ट्रात आतापर्यंत आढळलेला नाही. पण कोरोना व्हायरस संसर्गाची काळजी घेण्यासाठी मराठी तसेच हिंदी कलाकारांनी हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. तसेच बुधवारी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधान परिषदेच्या माध्यमातून राज्यातील जनतेस कोरोना व्हायरस संसर्गाची काळजी म्हणून सर्वसामान्यांनी प्रतिबंधनासाठी मास्कऐवजी स्वच्छ धुतलेला रुमाल वापरावा, असे आवाहन केले आहे.

Leave a Comment