‘चंपक चाचां’नी मागितली राज ठाकरे आणि मनसे परिवाराची माफी


सोमवारी सब टीव्हीवर प्रदर्शित झालेल्या ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील भागात एक वादग्रस्त संवाद पाहायला मिळाला होता. या मालिकेतील चंपक चाचा यांची भूमिका साकारणाऱ्या अमित भट्ट यांच्या तोंडी असलेल्या संवादामुळे वाद निर्माण झाला आहे. त्यांनी या भागात मुंबईची भाषा हिंदी असल्याचा उल्लेख केला होता. यावर राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाल्यानंतर चंपक चाचांची भूमिका साकारणाऱ्या अमित भट्ट यांनी राज ठाकरे आणि मनसे परिवाराला पत्र लिहित जाहीर माफी मागितली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात अमित भट्ट यांनी जो डायलॉग मला लेखकाने लिहून दिला होता, तो मी बोललो. मुबईची भाषा हिंदी नसून मराठीच आहे व त्याचा आम्हाला अभिमान आहे. झालेल्या चुकीबद्दल माफ करावे अशी विनंती अमित याने लिहिलेल्या पत्रात केली आहे.

दरम्यान तत्पूर्वी या मालिकेचे निर्माते असित मोदी यांनीही एक पोस्ट यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ’तारक मेहता’ची भूमिका साकारणारे शैलेश लोढा यांच्याकरवी व्हिडीओ पोस्ट करत माफी मागितली आहे. व्हिडिओत लोढा यांनी मित्रांनो एक विशेष गोष्ट. भारताची राजधानी असलेली महाराष्ट्राचे सुंदर शहर मुंबई. येथील स्थानिक आणि अधिकृत भाषा मराठी आहे. सोमवार प्रदर्शित झालेल्या भागात चंपक चाचाच्या माध्यमातून आम्ही सांगितले होते की येथील भाषा हिंदी आहे. याचा भावार्थ हा होता, की मुंबईने सर्व प्रांताच्या लोकांना आणि त्याच्या भाषांचा सन्मान केला आहे, त्यांना प्रेम दिले आहे. तरीही चंपक चाचांच्या या वाक्यामुळे कोणाचे मन दुखावले असेल, तर आम्ही अंत-करणापासून माफी मागतो. तारक मेहता का उल्टा चष्मा प्रत्येक प्रांताचा, भाषेचा आणि समुहांचा सन्मान करतो. या मिळून या देशाला महान बनवूया, जय हिंद. पण अद्यापही यावर मालिकेचे लेखक निरेन भट्ट यांनी कोणतेही भाष्य सोशल मीडियावर केलेले नाही. हा शो सोनी सब वाहिनीवरुन प्रसारित होत असतो. पण त्यांनी या प्रकरणी मौन बाळगणे पसंत केले आहे.

Leave a Comment