दुबईत होणार आशिया कप, भारत पाक खेळणार- गांगुली


फोटो सौजन्य क्रिकेट टाईम्स
बीसीसीआयचे अध्यक्ष आणि टीम इंडियाचा माजी कप्तान सौरव गांगुली यांनी आशिया कप दुबई येथे खेळला जाईल आणि त्यात भारत व पाकिस्तानचे संघ खेळतील असे जाहीर केले आहे. एशियन क्रिकेट कौन्सिलच्या बैठकीसाठी दुबईला रवाना होण्यापूर्वी कोलकाताच्या इडन गार्डनवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत गांगुली याने ही माहिती दिली.

यंदाचे आशिया कपचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव टीम इंडिया पाकिस्तान दौऱ्यावर जाणार नाही असे बीसीसीआयने पूर्वीच जाहीर केले होते. पाकिस्तानच्या यजमान पदाला बीसीसीआयचा विरोध नाही मात्र टीम इंडिया स्पर्धेत हवी असेल तर हे सामने पाकिस्तान बाहेर खेळविले जावेत असे सांगितले गेले होते. त्यानुसार हे सामने दुबई येथे घेतले जाणार आहेत. सप्टेंबरमध्ये हे सामने होणार आहेत.

२०१२-१३ पासून भारत पाकिस्तान याच्यामध्ये एकही द्विपक्षीय सिरीज खेळली गेलेली नाही. तेव्हा पाकिस्तानी संघ मर्यादित षटके सिरीज खेळण्यासाठी भारतात आला होता. राजकीय तणावामुळे दोन्ही देश फक्त आयसीसी मध्ये एकमेकांविरुद्ध खेळले आहेत.

Leave a Comment