सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली निर्भया प्रकरणातील विनय शर्माची याचिका


नवी दिल्ली – निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विनय शर्माने राष्ट्रपतींच्या दया याचिका फेटाळण्याच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करत त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे. त्याने न्यायालयाकडे स्वतःला मनोरुग्ण सांगत फाशी टाळण्याची मागणी केली होती. सर्वोच्च न्यायालयाने विनय मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याचे सांगितले. न्यायालयाने सुनावणीनंतर निर्णय सुरक्षित ठेवला होता.

हा निर्णय न्या. अशोक भूषण आणि ए एस बोपण्णा यांच्यासह न्या. आर भानुमती यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने दिली असून गुरुवारी निर्भया प्रकरणातील चार दोषींपैकी एक विनय शर्माच्या याचिकेवरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने सुरक्षित ठेवला होता. ज्यामध्ये त्याने राष्ट्रपतींकडून त्याच्या दया याचिकेच्या अस्वीकृतीस आव्हान दिले होते.

दोषी विनय शर्माचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिनिधीत्व करणारे वकील ए पी सिंह यांनी आपल्या पक्षकाराची दया याचिका फेटाळण्याच्या राष्ट्रपतींच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला होता. न्यायालयात यावर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी टीका केली होती. या प्रकरणात तुषार मेहता हे केंद्राची बाजू मांडत आहेत. दोषी विनयची मानसिक स्थितीसंबंधी ए पी सिंह यांनी युक्तिवाद केला. विनय हा मानसिकरित्या आजारी आहे. त्याच्यावर उपचार सुरु असल्याचा दावा त्यामध्ये केला होता.

Leave a Comment