आयसीसीच्या नव्या नियमांचा भारत, इंग्लंडसह ऑस्ट्रेलियाला बसू शकतो फटका


दुबई – आगामी विश्व चषक स्पर्धेसंदर्भात एका नव्या नियमाची घोषणा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) केली असून भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यासारख्या बलाढ्य संघांना या नियमामुळे फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

यासंदर्भात एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, आयसीसी विश्वचषकात सहभागी होणाऱ्या संघातील सदस्य संख्या कमी करण्याच्या विचार करत असून सध्या २५ जणांच्या चमूला आयसीसीच्या स्पर्धांसाठी परवानगी आहे. ती कमी करून २३ वर आणण्याची आयसीसीची तयारी आहे. संघांच्या राहण्या-खाण्याचा खर्चाचा भार आयसीसी स्पर्धेचे यजमानपद भूषवणाऱ्या देशावर पडत असल्याने आयसीसीने हा नवा नियम आणला आहे. याचा फटका भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यासारख्या मोठ्या संघांना बसणार आहे.

२०१५ च्या विश्वचषक स्पर्धेत महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने १६ वा खेळाडू म्हणून धवन कुलकर्णीला सोबत नेले होते. गतवर्षी झालेल्या विश्वचषक स्पर्धेत ऋषभ पंत हा काही काळ अनऑफिशियल सदस्य होता. शिखर धवनच्या दुखापतीनंतर त्याचा संघात समावेश करण्यात आला. भारतीय संघ २८ सदस्यांसह न्यूझीलंड दौऱ्यावर असून यात १५ खेळाडू, ४ प्रशिक्षक, २ नेट्समध्ये सरावासाठी स्पेशालिस्ट, १ ट्रेनर, १ फिजीओ, २ मसाजर, १ व्यवस्थापक, १ मीडिया मॅनेजर आणि १ लॉजिस्टीक मॅनेजर यांचा समावेश आहे.

Leave a Comment