चला जाणून घेऊया जोडवींचे आरोग्यदायी फायदे


आपल्या देशात हिंदू धर्मात विवाहित महिलांमध्ये जोडवी घालण्याची फार जुनी परंपरा आहे. टिकलीपासून ते पायातील जोडव्यांचाही विवाहित महिलांच्या श्रृंगारात समावेश असतो. केवळ विवाहित महिलांच्याच पायांमध्ये या जोडवी बघायला मिळतात. पण फार लोकांना याचे नेमके कारण माहिती नाही. किंवा असे म्हणूया की, बहुतेकांना हे घालण्या मागचे कारण काय असावे असा प्रश्न पडत नाही. सुंदर दिसण्यासोबतच जोडवींचे अनेक आरोग्यदायी फायदेही सांगितले आहेत. त्याचबरोबर यांचा उल्लेख आयुर्वेदातही करण्यात आला आहे.

केवळ पायांमध्ये केवळ श्रॄंगार म्हणून घातले जातात असे नाहीतर जोडवीचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. मासिक पाळी संबंधी समस्या जोडवी घातल्याने कमी होत असल्याचे म्हटले जाते. यासोबतच मासिक पाळी नियमीत वेळेवर येते.

शरिरातील सर्वच नाड्या आणि मांसपेशी जोडवी घातल्याने योग्य प्रकारे काम करतात. यामुळे तळव्यापासून ते नाभीपर्यंत नाड्या आणि पेशींच्या अनेक समस्या सुटतात. त्याचबरोबर गर्भाशयाशी जोडव्यांचा थेट संबंध असतो. सायन्सनुसार अंगठ्याच्या बाजूने दुस-या बोटात एक विशेष नस असते जी गर्भाशयाशी जोडलेली असते. ही गर्भाशयाला नियंत्रीत करते आणि रक्तस्त्राव संतुलित ठेवते. तसेच जोडवी घातल्याने महिलांमधील प्रजनन क्षमता वाढते, असेही बोलले जाते.

जास्तकरून जोडवी या ही चांदीची बनवलेली असते आणि चांदी एनर्जीसाठी चांगले माध्यम मानले जाते. त्यामुळे पॄथ्वीची ध्रुवीय ऊर्जा जोडवी घातल्याने स्वच्छ करून शरिरात पाठवली जाते आणि त्यामुळे शरीर ताजतवाणे राहते. आयुर्वेदानुसार, महिलांची प्रजनन क्षमता वाढवण्यात जोडवी महत्वपूर्ण भूमिका बजावतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment