फडणवीसांच्या घोषणेची उद्धव ठाकरे करणार अंमलबजावणी


मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकाळात घोषणा केलेल्या 70 हजार रिक्त पदांची भरती करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने घेतला आहे. त्यानुसार आता विविध विभागांतील 70 हजार रिक्‍त पदे भरण्यात येणार आहेत. काल ठाकरे सरकारच्या कॅबिनेटची बैठक पार पडली. त्यामध्ये या रिक्त पदांच्या भरतीबाबत चर्चा झाली.

ग्रामविकास, गृह, कृषी, पशू व दुग्धसंवर्धन, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, जलसंधारण, नगरविकास आणि आरोग्य विभागात सर्वाधिक रिक्‍त पदे आहेत. त्यामुळे तातडीने महाभरती प्रक्रिया राबवावी, अशी मागणी सर्वच मंत्र्यांनी केली. त्यानुसार आता ठाकरे सरकार ही भरती प्रक्रिया सुरु करणार आहे.

यापूर्वी 2018 मध्ये देवेंद्र फडणवीस सरकारने विविध विभागात 72 हजार पदांची भरती करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार 2018 मध्ये 36 हजार आणि 2019 मध्ये 36 हजार पदे भरली जाणार होती. शिक्षण सेवकांच्या धरतीवर पहिली पाच वर्ष मानधनावर काम करावे लागेल. त्यानंतर कामगिरी आणि पात्रता बघून नोकरीत कायम केले जाईल, असे त्यावेळी घोषित करण्यात आले होते. पण ही मेगाभरती लोकसभेच्या आचारसंहितेमुळे थांबली होती.

Leave a Comment