तुम्हाला माहिती आहे का अंत्यविधीवरून आल्यावर आंघोळ का करतात ?


या पृथ्वीतलावर कुणीही असो आणि कसाही असो त्याचे मरण हे अटळ आहे. एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर त्याचे संपूर्ण विधीनुसार अंत्यविधी करण्यात येतात. एखाद्या व्यक्तीच्या प्रेतयात्रेत मृतकाच्या तिरडीला खांदा देणे पूण्य मानले जाते. हिंदू धर्मात स्मशानभूमीत अंत्यविधी करुन आलेल्या व्यक्तीच्या अंगावर गंगाजल शिंपडले जाते किंवा त्या व्यक्तीला आंघोळ करावी लागते. पण तुम्हाला आंघोळ करण्यामागचे नेमके कारण माहिती आहे का? नाही ना? मग आम्ही आज तुम्हाला यामागचे नेमके कारण सांगणार आहोत.

एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर त्याच्या अंत्ययात्रेत सहभागी होणारा प्रत्येक व्यक्ती आंघोळ करतो हे तुम्हाला काही नव्याने सांगायला नको. यापैकी काहीजण तर असे असतात की, ज्यांना आंघोळ का करतात हे माहितीही नसते. त्यापैकीच तुम्ही देखील एक आहात का? स्मशानातून आल्यावर आंघोळ का करतात हे ज्यांना माहिती नाही. यामागचे नेमके कारण काय ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत आहे. अंत्यविधीनंतर आंघोळ करण्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक कारणही आहे.

स्मशानातून आल्यानंतर आंघोळ करण्यामागील धार्मिक कारण म्हणजे स्मशान एक अशी जागा आहे जेथे नकारात्मक शक्तींचा सहवास असतो. या शक्ती कमकुवत व्यक्तीवर लवकर कब्जा करतात. पुरुषांच्या अपेक्षा या महिलांपेक्षा अधिक भावूक आणि मानसिक रुपाने कमकुवत असतात आणि त्यामुळेच त्यांना स्मशानात जाण्यापासून रोखतात. असे म्हटले जाते की, अंत्यविधी संपल्यानंतर आत्मा काही काळ तेथच उपस्थित असतो. जो कुणावरही प्रभाव टाकण्याची शक्ती ठेवतो.

अंत्यविधीनंतर आंघोळ करण्यामागे वैज्ञानिक कारणही आहे. अंतिम संस्कार करण्यापूर्वी मृतदेह हा बराचकाळ बाहेर असतो त्यामुळे वातावरणात सुक्ष्म आणि संक्रामक किटाणूंचा संसर्ग वाढतो. तसेच मृत व्यक्तीचे शरीर संसर्गित रोगापासून ग्रासले जाते. त्यामुळे त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता असते. पण, आंघोळ केल्यानंतर किटाणू साफ होतात आणि म्हणून अंत्य संस्कार केल्यानंतर आंघोळ करण्याची प्रथा आहे.

Leave a Comment