मुंबई – वरळी पोलीस ठाण्यात अक्षयकुमारच्या विरोधात शिवप्रेमींकडून तक्रार दाखल करण्यात आल्यामुळे अक्षय कुमार वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. ‘निरमा’ पावडरच्या जाहिरातीमधून अक्षयकुमार याने छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या मावळ्यांचा अपमान केल्याचे तक्रारीमध्ये म्हटले आहे.
अक्षय कुमार हा संबधीत जाहिरातीमध्ये मावळ्याच्या भूमिकेमध्ये आहे. जाहिरातीमध्ये करण्यात आलेले चित्रण आक्षेपार्ह असल्याचे तक्रारीमध्ये म्हटले आहे. कंपनीच्या उत्पादनावर बहिष्कार टाकत असून निरमा कंपनीवर योग्य कारवाई करण्यात यावी, असे तक्रारीमध्ये म्हटले आहे. या जाहिरातीवरून अक्षय कुमार वादात सापडला आहे.