नवी दिल्ली – भारतीय रेल्वेच्या शताब्दी एक्सप्रेसमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. मंगळवारची ही घटना असून मुंबई-अहमदाबाद शताब्दी एक्स्प्रेसमध्ये ब्रेकफास्ट केल्यावर, 36 प्रवाशांची प्रकृती बिघडली आहे.
न्याहारीमध्ये प्रवाश्यांना चक्क बुरशीयुक्त ब्रेड देण्यात आला होता. प्रवाश्यांनी तो खाल्ल्यामुळे तब्येत बिघडली असल्याची तक्रार केली करण्यात आली त्यानंतर एकच खळबळ उडाली. प्रवाश्यांची सूरत स्टेशनवर डॉक्टरांकडून तपासणीही करण्यात आली. रेल्वेने आता असा नाश्ता पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराविरोधात कारवाई सुरू केली आहे.
Disgusting breakfast being served by the catering team of Shatabdi Express – 12009. The staff deliberately served expired food products during the meals. It can't get more pathetic than this. The authorities are absolutely not bothered about health issues.#irctc#PiyushGoyal pic.twitter.com/YRiIfIcjxo
— Atul Rane (@Aturane88) January 7, 2020
याबाबत जनसंपर्क अधिकारी खिराजराज मीना यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईहून सकाळी मुंबई-अहमदाबाद शताब्दी एक्सप्रेसमध्ये 40 महिलांचा एक गट सूरत सहलीसाठी जात होता. त्यादरम्यान, महिलांनी पॅन्ट्री कारमधील ब्रेकफास्टसाठी ब्रेड आणि बटर घेतला, परंतु न्याहारी केल्यानंतर पाच महिलांना उलट्या होऊ लागल्या. त्यांच्यावर सूरत रेल्वे स्थानकात त्यांच्यावर उपचार करण्यात आले आणि ब्रेकफास्टचा परतावा देण्यात आला. हळू हळू इतर प्रवाशांनीही याबाबत तक्रार केली. महिलांच्या तक्रारीवरून वडोदरा स्थानकात पॅन्ट्री कारच्या व्यवस्थापकाकडून आवश्यक कारवाई केली जात आहे.
अधिकाऱ्यांनी याबाबत सांगितले की, आयआरसीटीसी अधिकाऱ्यांना या घटनेनंतर निलंबित करण्यात आले आहे आणि कंत्राटदाराला दोन लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे, तसेच हा करार संपुष्टात आणण्यासाठी नोटीस देण्यात आली आहे.’ त्यानंतर ट्रेनमध्ये सर्व्ह केल्या जाणार्या इतर खाद्यपदार्थाचे नमुने एकत्र करुन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. मात्र या घटनेसंदर्भात रेल्वेकडून देण्यात येत असलेल्या सुविधांबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.