सासरे रावसाहेब दानवेंवर जावई हर्षवर्धन जाधवांचे गंभीर आरोप


मुंबई – भाजपचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी चकवा दाखवत कन्नड पंचायत समितीचे सदस्य फोडल्याचा गंभीर आरोप त्यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी केल्यामुळे राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

हर्षवर्धन जाधव म्हणाले, माझे पंचायत समितीचे सदस्य रावसाहेब दानवे यांनी फोडले आहेत. सभापतीच्या निवडणुका झाल्या. माझ्या स्वतंत्र असलेल्या रायभान जाधव विकास आघाडीच्या पाच सदस्यांना मी रूबेना कुरेशी यांना सभापती पदी आणि बनकर यांना उपसभापती पदी निवडण्याचे आदेश सदस्यांना दिले होते. पण, भाजपने त्यातील चार सदस्य पळवून नेले. स्वतःच्या एकाला भाजपने सभापती केले आहे. हा प्रकार घृणास्पद आहे. भाजपची मस्ती अजूनही जिरलेली नाही यावरून दिसत असल्यामुळे या गोष्टीचा मी तीव्र शब्दात निषेध करतो.

या सगळ्या घटनाक्रमात ज्यांना जालन्याचा चकवा असे म्हटले जाते, यात मोठा सहभाग केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी घेतल्याचे मला स्पष्टपणे जाणवत आहे. कारण त्यांनी सहभाग घेतला नसता, तर ही चार माणसे कधीच गळाला लागली नसती. कुठेतरी घरातूनच द्रोह झाल्याचे माझे स्पष्ट मत आहे. दानवे यांनी या आरोपाच खंडन केले, तरी रायभान जाधव कुटुंबाला आणि कन्नड तालुक्यातील जनतेला चकवा दिल्याचा आरोप मी केला तर काहीही चुकीचे नसल्याचा आरोप हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे.

Leave a Comment