मागील 9 वर्षांत 125 कोटी नागरिकांची आधार नोंदणी!


मुंबई – गेल्या 9 वर्षांत देशातील भारतीयांची ओळख असणाऱ्या आधार कार्डने नवा विक्रम रचला आहे. 2010 मध्ये सर्व नागरिकांना आपली ओळख पटवून देण्यासाठी केंद्र सरकारने आधार कार्ड लागू केले होते. आतापर्यंत देशातील 125 कोटी नागरिकांनी आधार कार्डची नोंदणी केली आहे. आधार कार्ड 2018 मध्ये सर्व सरकारी कामांसाठी तसेच योजनांसाठी सक्तीचे करण्यात आले आहे. आधार कार्ड सर्व ठिकाणी अनिवार्य असल्यामुळे सरकारला आधार नोंदणी करण्यात यश मिळाले आहे.

दररोज सुमारे 3 कोटी ‘ऑथेन्टिकेशन रिक्वेस्ट’ म्हणजे पडताळणी विनंत्या आधार कार्डकडे येतात. तसेच अनेक नागरिक आपले आधार कार्ड नेहमी अपडेट करत असतात. आतापर्यंत सुमारे 331 कोटी आधार कार्डांमध्ये UIDAI ने बायोमेट्रिक आणि डेमोग्राफिक अपडेट केले आहे. तसेच UIDAI कडे दररोज तीन ते चार लाख अर्ज अपडेट करण्यासाठी येतात.

नंदुरबार जिल्ह्यातील टेंभली गावातील एका महिलेला 2010 मध्ये पहिले 12 अंकी क्रमांकाचे आधार कार्ड देण्यात आले होते. सध्या सरकारच्या अनेक कार्यक्रमासाठी आधारकार्ड महत्त्वाचे कागदपत्र म्हणून गृहित धरले जाते. सरकारने आता आधार कार्ड-पॅनकार्ड लिंक करणे अनिवार्य केले आहे. तसेच येत्या 31 डिसेंबरला आधार-पॅन लिंक न केल्यास पॅनकार्ड अवैध ठरणार असल्याचंही केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे.

Leave a Comment