काँग्रेसची रामलीला मैदानावर ‘भारत बचाओ रॅली’


नवी दिल्ली – काँग्रेसच्या वतीने आज रामलीला मैदानावर ‘भारत बचाओ रॅली’चे आयोजन करण्यात आले असून देशभरात काँग्रेसतर्फे जिल्हास्तरासह राज्यस्तरावर सरकारच्या लोकविरोधी धोरणांच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनांचा समारोप या भारत बचाओ रॅलीने होणार आहे.

15 नोव्हेंबरपासून देशभरातील विविध भागांत काँग्रेसने आंदोलने सुरू केली आहेत. यातून केंद्रातील भाजपप्रणित सरकारच्या फसलेल्या धोरणांचा निषेध करण्यात येत आहे. दिल्लीमध्ये रामलीला मैदानावर केंद्र सरकारच्या लोकविरोधी धोरणांच्या निषेधार्थ भारत बचाव रॅली काढण्यात येत आहे.

देशात सध्या केंद्र सरकारच्या लोकविरोधी कार्यक्रमामुळे बिकट स्थिती आहे. आर्थिक स्थिती, शेतकऱ्यांवरील संकट, बेरोजगारी आणि इतर अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर विरोध करण्यासाठी करण्यात येणाऱ्या आंदोलनावर चर्चा करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे, असे काँग्रेस नेत्यांनी सांगितले.

Leave a Comment