बुद्धिमान गाढव का ठरलेय मूर्खपणाचे प्रतिक?


कुणी मुर्खपणा करत असेल किंवा फारच भोळेपणाने वागत असेल तर त्याला गाढव म्हणण्याची प्रथा आपल्याकडे फार पूर्वीपासून आहे. वास्तविक गाढव हा बुद्धिमान प्राणी मानला जातो. मग तरी ते मुर्खापणाचे प्रतिक बनले आहे याची मजेदार कारणे सांगितली जातात.


गाढव हे वास्तविक हट्टी मानले जाते पण तरीही त्याच्याकडून अतोनात कष्टाची सर्व कामे सहज करून घेतली जातात. त्याला सहनशक्ती खूप आहे आणि अरुंद, खडबडीत रस्त्यावर गाढवाची टाप पक्की असते. गाढवाचे कान लांब आहेत पण त्यामुळे ते १० मैलावरून दुसऱ्या गाढवाचा आवाज ऐकू शकते. त्याची स्मरणशक्ती उत्तम आहे त्यामुळे ३० वर्षानंतरही ते साथीदाराला ओळखू शकते.


गाढव समजूतदार आहे म्हणून त्याला महामुर्ख समजले जाते असे काही जणांचे मत आहे. ते फारच इमानदार आणि सरळ स्वभावाचे असते आणि अश्या स्वभावाच्या माणसांची फसवणूक सहज करता येते त्यामुळे अश्या स्वभावाच्या माणसाना गाढव म्हटले जाते. खूप कष्ट करूनही गाढवाला अन्य प्राण्यासारखा दर्जा नाही. ते चलाख नाही त्यामुळे भोळसट माणसे गाढव म्हटली जातात. गाढव कोणत्याही वातावरणात, कोणत्याची परिस्थितीत अॅडजस्ट करते. यामुळेच कोणतीही तक्रार न करता आलेल्या परिस्थितीला सामोरे जाणाऱ्या माणसाना गाढवाची उपमा दिली जाते. गाढव बुद्धिमान असूनही स्वतःच्या फायद्यासाठी तिचा वापर करत नाही यामुळेही ते मुर्खपणाचे प्रतिक बनले आहे.

Leave a Comment