आता बाळासाहेबांचा उल्लेख हिंदुहृदयसम्राट ऐवजी वंदनीय करावा लागेल


औरंगाबाद – औरंगाबादच्या भाजप विभागीय बैठकीत बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर टीका करताना सत्तेसाठी हिंदुत्वाचा मुद्दा शिवसेनेने सोडला असून, आता हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख वंदनीय बाळासाहेब ठाकरे करावा लागेल. शिवसेना आमच्या सोबत ज्या हिंदुत्वाच्या मुद्द्यांना घेऊन होती, सेनेने तो मुद्दा सोडल्याचे पाटील म्हणाले. तसेच आम्ही आगामी औरंगाबाद महानगर पालिका निवडणुकीत स्वतंत्र लढणार असल्याचे संकेतही पाटील यांनी दिले.

५ महिन्यांनी महानगर पालिकेची निवडणूक होणार आहे. आता भाजप लोकांच्या हितासाठी या निवडणुकीत स्वतंत्र लढण्याची तयारी करत असल्याचे पाटील म्हणाले. राज्यात महायुतीत बिघाडी झाल्याने नव्या समीकरणाचा जन्म झाला. आता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील या नव्या समीकरणामुळे युतीत बिघाडी झाली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तसे संकेत दिले आहेत. सत्तेसाठी हिंदुत्वाचा मुद्दा शिवसेनेने सोडला असून, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जागी आता वंदनीय बाळासाहेब ठाकरे झाल्याची टीका त्यांनी औरंगाबादमध्ये केली.

गेल्या ३ वर्षांपासून औरंगाबाद महानगर पालिकेत शिवसेना-भाजप युतीची सत्ता आहे. शिवसेना आणि भाजप ५ वर्षांच्या कार्यकाळात महापौरपद वाटून घेत पालिकेच कामकाज पाहत होती. मात्र, राज्यात सत्ता समीकरण बदलले आणि ३० वर्षे जुनी युती क्षणात मोडल्यामुळे आगामी औरंगाबाद महानगर पालिका निवडणुकीत भाजप स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. त्याचबरोबर त्याबाबत आता रणनीती देखील आखली जात आहे.

Leave a Comment