नेहरु घराण्यामुळेच होत आहेत नक्षलवाद, दहशतवाद, बलात्कार


नवी दिल्ली – विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची या आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. त्यातच आता त्यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मेरठ येथे एका कार्यक्रमात बोलताना देशात जो काही नक्षलवाद, दहशतवाद, बलात्कारसारख्या घटना नेहरू घराण्यामुळेच होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

भारताला जगाची ‘रेप कॅपिटल’ म्हणजेच बलात्कारांची राजधानी काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी म्हटले होते. प्राची यांनी या वक्तव्यावरून राहुल गांधीवर टीका केली. देशामध्ये नक्षलवाद, दहशतवाद, बलात्कार हे सर्व नेहरूंच्या कुटूंबामुळेच होत असल्याचे त्या म्हणाल्या.

त्यांनी याचबरोबर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावरही टीका केली. अखिलेश सत्तेत असताना बलात्कार करणाऱ्याची पाठराखण करतात, असे त्या म्हणाल्या. हैदराबाद सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणातील चार आरोपींचे एन्काउंटर केल्याबद्दल साध्वी प्राची यांनी पोलिसांचे कौतूक केले. उत्तर प्रदेश पोलिसांनी अशीच कारवाई उन्नाव प्रकरणावर केली पाहिजे , असे त्या म्हणाल्या.

Leave a Comment