#SayItLikeNirmalaTai : ‘कांदा’ वक्तव्यामुळे पुन्हा ट्रोल झाल्या अर्थमंत्री

सध्या कांद्याचे भाव आकाशाला भिडले आहेत. महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे व अर्थव्यवस्था देखील मंदावली आहे. मात्र सध्या केंद्र सरकारमधील मंत्री आपल्या वक्तव्यावरून ट्रोल होत आहे.

कांद्याच्या वाढलेला भावाविषयी संसदेमध्ये विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ‘मी जास्त कांदा आणि लसून खात नाही. मी अशा कुटूंबातून येते जेथे कांदा आणि लसूणला अधिक महत्त्व दिले जात नाही.’, असे विचित्र स्पष्टीकरण दिले.

कांद्याच्या भाववाढीवरून निर्मला सीतारमण यांनी दिलेल्या अजबगजब स्पष्टीकरणानंतर पुन्हा एकदा ट्विटरवर #SayItLikeNirmalaTai ट्रेंड होऊ लागले. विरोधी पक्षापासून ते बॉलीवूड अभिनेत्रींनी देखील निर्मला सीतारमण यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली.

अर्थमंत्र्यांच्या या विचित्र वक्तव्यामुळे पुन्हा एकदा नेटकऱ्यांना मिम्स शेअर करण्याची चांगलीच संधी मिळाली.

निर्मला सितारमण यांच्या वक्तव्यावर टीका करताना काँग्रेसने ट्विट केले की, ‘येथे जे काही वाढले जाते, त्यामध्ये अंहकार आहे. चिमूटभर अज्ञानता आणि ढीगभर अक्षमता आहे.’ या सोबतच काँग्रेसने कॅफे निर्मला ताई असा फोटो शेअर केला आहे. या कॅफेच्या मेन्यूमधून कांदा गायब आहे.

अभिनेत्री ऋचा चड्ढा देखील उपहासात्मक ट्विट करत म्हणाली की, ‘त्यांना केक खाऊ द्या, कारण मी कांदा खात नाही.’

https://twitter.com/Polytikle/status/1202463128136499202

नेटकऱ्यांनी देखील निर्मला सीतारमण यांच्या वक्तव्यावर मिम्स शेअर केले.

Leave a Comment