या राज्यात चक्क आधार कार्ड तारण ठेवून सोनार करत आहेत कांद्याची विक्री


देशभरात कांद्याचा भाव प्रति किलो कांदा 100 ते 110 रुपयांना जाऊन पोहचला आहे. कांदे महाग झाल्यामुळे सर्वसामान्यांच्या जेवणाची चवही खराब झाली आहे. त्याचबरोबर देशभरात सध्या कांद्यावर राजकारण सुरू झाले आहे. विरोधी पक्ष कांद्यावरून सरकारवर हल्लाबोल करत आहेत. समाजवादी युवा सभेतील कामगार या पार्श्वभूमीवर चक्क कर्जावर कांदा देत आहेत. वाराणसीच्या सुंदरपूर येथील दागिन्यांच्या दुकानात कांदा कर्जावर दिला जात आहे. आपले दागिने गहाण ठेऊन महिला कांदा कर्जावर घेत आहेत. जनतेकडून हा प्रकार म्हणजे कांदा दरवाढीचा निषेध आहे.

आधार कार्ड तारण ठेऊन कांदा कर्ज स्वरूपात समाजवादी पक्षाच्या युवा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चालवलेला प्रकार काही दुकानांवर दिला जात असल्याचे दिसून आले आहे. त्याचबरोबर तेथील कांदा चक्क तिजोरीत बंद करून ठेवला जात आहे. एका समाजवादी कार्यकर्त्याने याबाबत बोलताना सांगितले की, कांद्याच्या महागाईचा अशा प्रकारे आम्ही निषेध करत आहोत. आधार कार्ड किंवा दागिने गहाण ठेवून आम्ही कांदा देत आहोत.


सरकारने कांद्याची महागाई रोखण्यासाठी 1.2 लाख टन कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे, पण दिल्लीतील आझादपूर बाजाराचे व्यापारी आणि कांदा व्यापारी संघटनेचे अध्यक्षांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे 50,000-60,000 टन एवढ्या कांद्याची देशात दररोज उलाढाल होते. अशा परिस्थितीत परदेशातून 1.2 लाख टन कांदे आल्यावर ते फक्त दोन दिवसच पुरतील.

दरम्यान, बिहार राज्य सहकारी विपणन असोसिएशन लिमिटेड (BISCOMAUN) सर्वसामान्यांना काही दिलासा मिळावा म्हणून गेल्या काही दिवसांपासून लोकांना स्वस्त दरात कांदा पुरवित आहे. 35 रुपये किलोने हा कांदा विकला जात असल्यामुळे हा कांदा घेण्यासाठी लोक हजोरोंच्या संख्येने येत आहेत. अशात काल इथे कांद्यासाठी मारामारी झाल्याचेही पाहायला मिळाले.

Leave a Comment