जाणून घ्या भारतीय संविधानाबद्दल महत्त्वाच्या गोष्टी


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला राज्यघटना प्रदान केली तोच दिवस आज देशभरात ‘संविधान दिवस’ साजरा केला जात आहे. संविधान दिनाच्या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचे आजोयन करण्यात आले आहे. पण आपल्यापैकी अनेकांना संविधानाबद्दल काही महत्वाच्या गोष्टी माहित नसतील त्याच आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. चला तर मग जाणून घेऊया… संविधानाबद्दलच्या महत्वाच्या गोष्टी

देशभरात २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. कारण देशाच्या संसदेत २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधानाला अधिकृतपणे मान्यता देण्यात आली होती. दोन वर्षे ११ महिने आणि अठरा दिवस या दीर्घ कालावधीत संविधान सभेने देशाचे संविधान पूर्ण केले.

हिंदी आणि इंग्रजी भाषेत आपले संविधान हाताने लिहिले गेल्यानंतर बिहारी नारायण रायजादा कॅलिग्राफी ही कला अवगत असल्याने कॅलिग्राफत ते पुन्हा लिहिण्याची जबाबदारी त्यांना देण्यात आली. भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे.

मसुदा समितीने २९ ऑगस्ट १९४७ पासून आपल्या कामकाजास सुरुवात केली. भारतीय संविधानाचा मसुदा जवाहरलाल नेहरू,अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, एन. गोपालस्वामी अय्यंगार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, के. एम. मुन्शी, सय्यद मोहमद सादुल्लाह, बी. एल. मित्तर, डी. पी. खैतान अशा दिग्गज नेत्यांच्या मसुदा समितीने तयार केला. घटना समिती ९ डिसेंबर १९४६ रोजी गठित करण्यात आली. या समितीचे सच्चिदानंद सिन्हा हंगामी अध्यक्ष होते. पुढे डॉ. राजेंद्रप्रसाद ११ डिसेंबर १९४६ रोजी या समितीचे अध्यक्ष झाले.

संविधान समितीच्या संदस्यांची संख्या फाळणीनंतर २९२ झाली. समितीच्या ११ बैठका झाल्या. १६५ दिवस त्या चालल्या. समितीच्या १९ उपसमित्या जलद कामकाजाच्या दृष्टीने कार्यरत होत्या. त्यात मसुदा समिती होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महत्त्वाच्या समितीच्या अध्यक्षपदी होते. ४४ सभा या मसुदा समितीच्या झाल्या.

भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान असून राज्यघटनेत समता, बंधुता, स्वातंत्र्य व न्याय तसेच प्रज्ञा, शील, करुणा व मैत्री या मूल्यांची बीजे रोवून भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यात आली. मुळ घटनेत १ प्रास्ताविका, ८ अनुसुची, २५ भाग आणि ३९५ कलमे होती. सध्या (जुलै २०१७) मध्ये भारताच्या घटनेत १ प्रास्ताविका, १२ अनुसुची, २५ भाग, ४४८ कलमे, ५ परिशिष्टे आहेत. आतापर्यंत १०१ संविधनात घटनादुरुस्त्या झाल्या आहेत.

भारतीय संविधानाचा स्वीकार २६ जानेवारी, १९५० रोजीच करण्यात आला. भारत देश प्रजासत्ताक देश म्हणून अस्तित्वात आला. भारताचे संविधान बनून तयार होत होते. पण संविधान हे हस्तलिखीत असावे अशी नेहरुंची इच्छा होती. बिहारी नारायण रायजादा कॅलिग्राफीची कला अवगत असल्यानं याची जबाबदारी त्यांना देण्यात आली. संविधान लिहिण्यासाठी २५४ दौत आणि ३०३ पेन वापरण्यात आले. संविधान लिहिण्यासाठी ६ महिने लागले. भारतीय संविधानातील संपूर्ण हस्तकला आचार्य नंदलाल बोस यांच्या मार्गदर्शनाखाली शांतिनिकेतनमधील कलाकारांनी पूर्ण केली होती. जबलपूरचे व्यौहार राममनोहर सिन्हा यांनी तसेच प्रास्ताविकाच्या व संविधानाच्या इतर पानांवरील नक्षीकाम व सजावट केली आहे.

Leave a Comment