आमच्यासाठी बहुमत सिद्ध करण्यासाठी ३० मिनिटेही खूप झाले


मुंबई – सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्वागत केले असून ३० तास काय ३० मिनिटांतही आम्ही बहुमत सिद्ध करु शकतो, असा दावा त्यांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आज महाराष्ट्रामधील सत्तासंघर्षावर महत्वपूर्ण निर्णय देत २७ नोव्हेंबर रोजी बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी सत्याचा विजय झाला असल्याचे म्हटले आहे.

न्यायव्यवस्था या देशात सर्वोच्च असून आम्ही जे न्यायालयात बोलत होतो, ते सत्यच होते. ते न्यायालयाच्या निकालामुळे खरे ठरले आहे. सत्याचा विजय झाला असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने आमचे सगळे मुद्दे मान्य केले आहेत. या देशात अजूनही सत्य पराभूत होत नाही. आम्ही ३० तास काय ३० मिनिटांतही बहुमत सिद्ध करु शकतो, असा दावाही संजय राऊत यांनी केला आहे.

Leave a Comment