महाविकासआघाडीचे आमदार बहुमत चाचणीदरम्यान फुटणार !


कानपूर – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कानपूरमध्ये महाराष्ट्रात सुरु असलेल्या सत्तासंघर्षावर प्रतिक्रिया देताना शिवसेना आणि काँग्रेसच्या मागे न लागता शरद पवार यांनी एनडीएला पाठिंबा द्यावा. हे देशाच्या हितासाठी योग्य आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसचे आमदार ३० नोव्हेंबरला बहुमत चाचणी दरम्यान फुटण्याची शक्यता असल्याचे वक्तव्यही त्यांनी केले.

एनडीएसोबतच माझे आमदार असून आम्ही सर्वजण बहुमत सिद्ध कसे करता येईल? यावर लक्ष केंद्रीत करीत आहोत. मला अनेक आमदार ओळखतात. त्यामुळे आमदार फुटण्याची शक्यता असल्याचेही आठवले म्हणाले. एनडीएला शरद पवारांनी पाठिंबा दिल्यास केंद्रामध्ये त्यांना २ मंत्रीपदे मिळू शकतात. सुप्रिया सुळे या मंत्री बनू शकतात. सत्तेसाठी नाहीतर जनतेच्या हितासाठी तरी पवारांनी एनडीएला पाठिंबा द्यायला पाहिजे, असा सल्ला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शरद पवारांना दिला आहे. शरद पवारांचा मी सन्मान करत असल्याचे देखील आठवले म्हणाले.

Leave a Comment