हरभजनची दादाकडे निवड समिती बदलण्याची मागणी


नवी दिल्ली – सध्या चांगल्याच फॉर्मात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आहे. भारताने विश्वचषकात उपांत्य फेरीतून माघारी परल्यानंतर विंडीज, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशला पराभवाचे पाणी पाजले. यानंतर घरच्या मैदानावर भारताला आता वेस्ट इंडिजचा सामना करायचा आहे. बीसीसीआयच्या निवड समितीने या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. या संघनिवडीत युवा यष्टीरक्षक संजू सॅमसनला वगळण्यात आले आहे.

सोशल मीडियावर चाहत्यांनी निवड समितीच्या या निर्णयावर आपली नाराजी व्यक्त केली. युवा यष्टीरक्षक ऋषभ पंतला संधी मिळूनही त्याची कामगिरी सुधरत नसल्यामुळे बांगलादेशविरुद्ध मालिकेत सॅमसनची संघात निवड झाली होती, पण अंतिम संघात त्याला स्थान मिळाले नाही. सॅमसनला वगळण्याच्या निर्णयावर काँग्रेसचे लोकसभा खासदार शशी थरुर यांनीही आश्चर्य व्यक्त केले. हरभजन सिंहने देखील आता यावर आपले मत व्यक्त करत भारताची निवड समिती बदलण्याची मागणी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीला केली आहे.

टी-२० मालिकेसाठी संघ – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, ऋषभ पंत, मनिष पांडे, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, रविंद्र जाडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, दिपक चहर, भुवनेश्वर कुमार

वन-डे मालिकेसाठी संघ – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, ऋषभ पंत, मनिष पांडे, श्रेयस अय्यर, केदार जाधव, रविंद्र जाडेजा, शिवम दुबे, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, दिपक चहर, भुवनेश्वर कुमार

Leave a Comment