मी पुन्हा आलोय गोरगरीब जनता आणि शेतकऱ्यांसाठी


मुंबईः देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुंबईत भाजपच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. आपल्याला एक मित्र सोडून गेला. पण आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादांच्या सोबतीने राज्याला मजबूत सरकार देणार, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. केवळ महाराष्ट्राच्या जनतेशी आपली बांधिलकी असून महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेसाठी आणि शेतकऱ्यांसाठी हे सरकार काम करेल. आम्ही शिवछत्रपतींच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवणार असे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी ‘मोदीजी है तो मुमकीन है’ अशी घोषणा दिली. त्याचबरोबर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा, भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचे यावेळी आभार मानले. आज या पदावर भाजप कार्यकर्त्यांमुळेच असल्याचे सांगत फडणवीस यांनी भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे देखील आभार मानले.

Leave a Comment