अरे राऊत.. आता तरी शांत बस बाबा!


मुंबई – भाजपचे प्रदेशआध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीनंतर माध्यमांशी संवाद साधताना शिवसेनेवर जहरी टीका करताना जनमताचा शिवसेनेने अनादर केला असून, बहुमत असतानाही सातत्याने काँग्रेस व राष्ट्रवादीच्या संपर्कात राहिले. तसेच त्यांनी पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केला आहे. सकाळी शिवसेनेच्या संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपच्या नेत्यांवर घोडेबाजारीचा आरोप केला होता. यावर बोलताना, अरे राऊत.. आता तरी शांत बस बाबा! अशी टीका त्यांनी केली आहे.

आमचा शिवसेनेने कायमच अपमान केल्याचे त्यांनी म्हटले. तसेच राऊत यांच्या तोंडी पाठीत खंजीर खुपसण्याची भाषा शोभत नसून त्यांनीच आमच्या पाठीत खुपसला असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. राज्याची आणि शिवसेनेची वाट संजय राऊत यांनी लावल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्षांनी केला आहे.शिवसेनेने कधीच बैठकींमध्ये सहकार्य केले नसून, सुरुवाती पासूनच मुख्यमंत्रीपदाचा अट्टाहास धरल्याने सकारात्मक चर्चेला वाव न राहिल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Comment