‘या’ देशात तब्बल 270 रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे कांदा


मुंबई : आपल्या देशातील कांद्याने किंमतीच्या बाबतीत उंची गाठल्यानंतर याचा परिणाम आता इतर राज्यांवर पाहायला मिळत आहे. कांदा 100 रुपये किलोने महाराष्ट्रात विकला जात असल्यामुळे महिलांचे बजेटच बिघडले आहे. असे असतानाच शेजारी देश असलेल्या बांगलादेशमध्ये देखील 9 टक्क्यांनी कांद्याची किंमत वाढली आहे. बांगलादेशला महागड्या दरात कांदा आयात करावा लागत आहे.

या देशातील कांद्याने किंमतीच्या बाबतीत उच्चांक गाठला आहे. एकेकाळी 30 रुपये प्रतिकिलो दराने विकला जाणार कांदा आजमितीस 270 रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. बांगलादेश सरकारला कांदा विमान मार्गाने आयात करावा लागत आहे. वाढत्या महागाईमुळे सामान्यांच्या ताटातून कांदा गायब झाला आहे.

बांगलादेशमध्ये वाढत्या कांद्याच्या दराला भारत देखील जबाबदार आहे. भारतात कांद्याचे दर वाढल्यानंतर सप्टेंबर महिन्यापासून कांदा निर्यात करणे बंद केले आहे. कांद्याच्या शेतीचे अवकाळी पाऊस आणि महापूरामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. ज्यामुळे कांद्याच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. यामुळे भारतातही कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली असून याच्या तुलनेत बांग्लादेशमध्ये दर वाढले आहेत.

बांगलादेशमध्ये कांदा विमानाद्वारे आयात केला जात असल्यामुळे कांद्याच्या दरात वाढ झाली आहे. बांगलादेशमधील नागरिकांच्या स्वयंपाकघरातून कांदा जवळपास हद्दपार झाला आहे. याला सामान्यांकडून विरोध दर्शवला जात आहे. म्यांमार, तुर्की, चीन आणि मिस्त्रमधून कांदा आयात केला जात आहे.

बांग्लादेशात सरकारी संस्थान ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ बांग्लादेशने 45 रुपये प्रति किलोने कांदा विकायला सुरूवात केली आहे. मात्र सब्सिडीतून कांदा खरेदीसाठी नागरिकांना तासन् तास रांगेत उभे राहावे लागत आहे. वाढलेल्या दरामुळे हॉटेल मालकांनी आणि स्नॅक्स दुकानदारांनी कांद्याचा कमी वापर केला आहे.

Leave a Comment