राष्ट्र निर्माणामध्ये संघाचे कार्य अधिक महत्वाचे – गडकरी


पुणे – पुण्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (एबीव्हीपी) कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघाशी संबंधित संघटना केवळ सरकार बनवण्यापुरते मर्यादित नसून राष्ट्र निर्माणामध्ये संघाचे कार्य अधिक महत्वाचे असल्याचे म्हटले आहे. आमचा दृष्टीकोन स्पष्ट असून सरकार बनवणे, मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान बनवण्यापर्यंत मर्यादित नाही. यात राष्ट्रनिर्माण अधिक महत्वाचे आहे. महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेबाबत गडकरींनी थेट काहीच म्हटले नाही. पण आमच्यासाठी विचारसरणी अत्यावश्यक आहे आणि त्याही पेक्षा वैयक्तिक संबंध गरजेचे असल्याचे गडकरींनी म्हटले आहे.

24 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आले. यात एकत्रित निवडणूक लढवणाऱ्या भाजप आणि शिवसेनेच्या महायुतीला स्पष्ट बहुमत देखील मिळाले. पण दोन्ही पक्षांमध्ये मुख्यमंत्री पदावरून वाद झाला आणि सरकार स्थापनेला विलंब झाल्यानंतर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी 12 नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली आणि त्यावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली. सध्या भाजपकडे 105, शिवसेनेकडे 56 आमदार आहेत. अशात शिवसेना, राष्ट्रवादी (54) आणि काँग्रेस (44) एकत्रित येऊन सत्ता स्थापनेचे प्रयत्न करत आहेत.

Leave a Comment