भाजप जिल्हाध्यक्षांनी केलेल्या वक्तव्याबद्दल मुस्लीम समाजाची उदयनराजेंनी मागितली माफी


सातारा – भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी लोकसभा पोटनिवडणुकीदरम्यानन कराडमधील प्रचार सांगता सभेत केलेल्या वत्तव्यामुळे मुस्लीम समाजामध्ये संताप होता. उदयनराजे भोसले निकालानंतर प्रथमच काल कराड येथे आले होते. उदयनराजेंनी पंकज हॉटेलच्या हॉलमध्ये मुस्लीम समाजाच्या बैठकीत बोलताना भाजप जिल्हाध्यक्षांनी केलेल्या वक्तव्याबद्दल मुस्लीम समाजाची त्यांनी माफी मागितली आहे. शरद पवार आणि खासदार श्रीनिवास पाटील यांच्यावरही त्यांनी यावेळी टीका केली.

उदयनरोजे म्हणाले, जर मी कराडातील त्या सभेत पावसकरांच्या भाषणावेळी व्यासपीठावर उपस्थित असतो तर त्यावेळी मी भाजप जिल्हाध्यक्षाला खाली खेचले असते. मला सुद्धा माफी मागताना लाज वाटत आहे. कोणताही समाज माझ्याकडून दुखावला जाईल, असे कृत्य मी केले अथवा करणार नाही. ते दुसर्‍याने केले असेले तरी मी आपली माफी मागतो. समाजात सौहार्दाचे वातावरण रहावे हीच त्यामागील भावना आहे. माझ्या प्रचारात सुरूवातीला भाजप जिल्हाध्यक्ष सहभागी नव्हते. पण, त्यांनी सांगता सभेत येऊन माझ्या सर्व कामावर विरजण टाकले. अशा भिकारड्या प्रवृत्तीला ठेचायला हवे.

सत्ता स्थापन ज्यांना कुणाला करायची आहे. त्यांनी लवकर सत्ता स्थापन करावी, ही राज्यातील नागरिकांची प्रामाणिक इच्छा असल्याचेही उदयनराजे म्हणाले. माझी गरज जिल्ह्यातील लोकांना असती, तर या घसरगुंडीवरून मी खाली गेलो नसतो. ही घसरगुंडी उलटी करायला फार वेळ लागणार नाही, असा इशाराही त्यांनी अप्रत्यक्षरित्या राष्ट्रवादीला दिला. त्याचबरोबर काहीतरी ठोस काम करण्याचा खासदार श्रीनिवास पाटील यांना सल्ला द्यायलाही उदयनरोजे निसरले नाही. आपल्यावर राष्ट्रवादीत अन्याय झाल्याची भावनादेखील यावेळी उदयनराजेंनी माध्यमांसमोर व्यक्त केली.

Leave a Comment