3 पक्षांचे सरकार 6 महिने देखील टीकणार नाही – फडणवीस


मुंबई – भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात ३ पक्षांचे सरकार चालूच शकत नसल्यामुळे राज्यात भाजप वगळता कोणतेही सरकार स्थापन होऊ शकत नाही, असे वक्तव्य केले आहे. नुकतीच भाजपच्या आणि भाजप समर्थक आमदारांची बैठक पार पडली. देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीला संबोधित केले. 3 पक्षांचे सरकार राज्यात बनणार नाही आणि जर बनलेच तर ते 6 महिने देखील टिकाव धरणार नसल्यामुळे पुन्हा भाजपचे सरकार येणार असा विश्वास माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना संबोधित करताना व्यक्त केला.

जेव्हा आपली सत्ता स्थापनेची वेळी येईल, तेव्हा मुंबईत तुम्हाला बोलावण्यात येईल. पण, आता आपल्या मतदारसंघातील लोकांमध्ये जाऊन काम करा आणि शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांना दिलासा द्या, असा सल्ला फडणवीस यांनी आमदारांना दिला. याचबरोबर बैठकीत प्रेझेंटेशनद्वारे विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या कामगिरीचे विश्लेषण करण्यात आले.

Leave a Comment