कृषि मालाला चांगला बाजारभाव मिळावा यासाठी कृषि उत्पन्न बाजार समित्या बंद करा


नवी दिल्ली : राष्ट्रीय कृषि व ग्रामीण विकास बँकेतर्फे दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कृषि मालाला चांगला बाजारभाव मिळावा, यासाठी राज्यांनी एपीएमसी बंद करुन ई-नाम या व्यवहार पद्धतीचा वापर करावा, असे आवाहन केले आहे.

शेतकऱ्यांच्या कृषि उत्पादनाला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून योग्य दर मिळणे शक्य होत नसल्याचे सीतारामन म्हणाल्या. राज्यांनी या यंत्रणेऐवजी ई-नामकडे अधिक गतीने वळायला हवे, असेही त्यांनी सांगितले. मोदी सरकारची आठवडा, दोन आठवड्यात देशातील जवळपास 7500 कृषी बाजार समिती ई-नामला जोडण्याची योजना आहे. परिणामी अॅमेझॉन, फ्लिपकार्ट यासारखा ऑनलाईन प्लटफॉर्म शेतकऱ्यांना मिळणार आहे.

केंद्र शासनाने राष्ट्रीय कृषी बाजाराची संकल्पना शेतमाल विक्री व्यवस्थेमधील पारंपरिक पद्धती बंद करुन संगणकीकृत आणि ऑनलाइन लिलावाद्वारे व्यवहार करण्यासाठी प्रत्यक्षात आणली आहे. त्यासाठी ई-नाम (इलेक्ट्रॅानिक नॅशनल ऍग्रीकल्चर मार्केट) हे एक व्यापार पोर्टल www.enam.gov.in निर्माण करण्यात आले आहे. देशातील बाजार समित्या व त्यांचे व्यवहार याद्वारे इंटरनेटद्वारे राष्ट्रीय बाजारपेठेशी जोडण्यात आलेले आहे.

Leave a Comment