सेनामहाआघाडीचा अंतिम निर्णय सोनिया गांधीच घेतील – मल्लिकार्जुन खर्गे


जयपूर – काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी जयपूर येथे बोलताना महाराष्ट्र काँग्रेसच्या संदर्भातील सर्व निर्णय सोनिया गांधी घेतील आणि तोच निर्णय अंतिम राहील, असे म्हटले आहे. भाजप शिवसेनेला सत्तेत बसण्याचे बहुमत जनतेने दिले असून विरोधीपक्षात बसण्याचे जनमत आम्हाला दिल्यामुळे सरकार युतीने स्थापन करावे, विरोधीपक्षाची भूमिका आम्ही पार पाडू, असेही खर्गे यावेळी म्हणाले. तसेच जो निर्णय हायकमांड घेतील तो मान्य असले असेही त्यांनी सांगितले.

जयपुरमधील ब्यूना विस्टा रिसोर्टमध्ये राज्यातील काँग्रेसच्या सर्व आमदारांना ठेवण्यात आले आहे. त्यांची भेट घेण्यासाठी त्याठिकाणी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची रेलचेल सुरू आहे. या आमदारांची मलिलकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी रिसोर्टमध्ये भेट घेऊन चर्चाही केली आहे. तसेच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही रविवारी रात्री या सर्व आमदारांसोबत डिनर करत चर्चा केली आहे.

Leave a Comment