राहुल गांधींच्या सामंजस्यपणाचा शिवसेनेकडून कौतुक


मुंबई – बहुप्रतीक्षीत वादग्रस्त रामजन्मभूमीचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने हिंदूच्या बाजूने दिला. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी या निकालाचे अत्यंत नम्रपणे स्वागत केले. शिवसेनेने त्यावरून राहुल गांधी यांचे कौतुक केले आहे. तर ओवेसी यांच्यावर निशाणा साधला आहे. पण सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या सत्ता स्थापनेच्या घडामोडींची किनार राहुल गांधीच्या या कौतुकाला असल्याचे दिसून येते.

देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येचा निकाल दिला आहे, राहुल गांधी यांनी त्या निर्णयाचा आदर करू, असे म्हटले आहे. हा राहुल गांधी यांचा सामंजस्यपणा असल्याचे म्हणत शिवसेनेने पक्षाचे मुखपत्र सामनामधून कौतुक केले आहे. राम मंदिर निकाल प्रश्नी राहुल गांधीचे कौतुक करताना त्यांनी एमआयएम ओवेसींवरही निशाणा साधला आहे. जो सामंजस्यपणा राहुल यांनी दाखवला तो ओवेसी यांनी दाखयला पाहिजे होता, असा टोला त्यांनी लगावला आहे.

सध्या सत्ता स्थापनेवरून महाराष्ट्रात रणकंदन सुरू आहे, रविवारी संध्याकाळी सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपने आम्ही सत्ता स्थापनास असमर्थ असल्याचे स्पष्ट केल्यानंतर शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत.

Leave a Comment