राम मंदिर-बाबरी मशिद प्रकरणात सर्वोच्च न्यायलयाचे 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. वादग्रस्त जागा राम मंदिरासाठी व मशिदीसाठी पर्यायी जागा देण्यात येईल, असे न्यायालयाने म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, न्यायालयाने आपला निर्णय दिला असून, या निर्णयाकडे कोणाचा विजय अथवा पराभव या दृष्टीने बघितले नाही पाहिजे. तर सरसंघचालक मोहन भागवत यांनी देखील या निर्णयाचे स्वागत केले.
Mohan Bhagwat,RSS Chief: We welcome this decision of Supreme Court. This case was going on for decades and it has reached the right conclusion. This should not be seen as a win or loss.We also welcome everyone's efforts to maintain peace and harmony in society. #Ayodhyajudgement pic.twitter.com/DtNnliaKEA
— ANI (@ANI) November 9, 2019
यह फैसला न्यायिक प्रक्रियाओं में जन सामान्य के विश्वास को और मजबूत करेगा।
हमारे देश की हजारों साल पुरानी भाईचारे की भावना के अनुरूप हम 130 करोड़ भारतीयों को शांति और संयम का परिचय देना है।
भारत के शांतिपूर्ण सह-अस्तित्व की अंतर्निहित भावना का परिचय देना है।
— Narendra Modi (@narendramodi) November 9, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, रामभक्ती असो अथवा रहीमभक्ती. ही वेळ आपल्याला भारतभक्तीची भावना सशक्त करण्याची आहे. शांती, सद्भावना आणि एकता कायम ठेवा.
श्रीराम जन्मभूमि पर सर्वसम्मति से आये सर्वोच्च न्यायालय के फैसले का मैं स्वागत करता हूँ।
मैं सभी समुदायों और धर्म के लोगों से अपील करता हूँ कि हम इस निर्णय को सहजता से स्वीकारते हुए शांति और सौहार्द से परिपूर्ण ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ के अपने संकल्प के प्रति कटिबद्ध रहें।
— Amit Shah (@AmitShah) November 9, 2019
गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, मी सर्व समुदाय आणि धर्माच्या लोकांना सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे स्विकार करण्याचे आणि शांती कायम ठेवून एक भारत श्रेष्ठ भारताच्या प्रती एकनिष्ठ राहण्याचे आवाहन करतो.
A Owaisi: Congress has shown their true colours,but for Congress party's deceitness&hypocrisy,idols would not have been placed in 1949, had the locks not opened by Rajiv Gandhi the masjid would still be there,had Narasimha Rao discharged his duties the masjid would still be there https://t.co/pOg4RJgaGo pic.twitter.com/FSpOkcwjHl
— ANI (@ANI) November 9, 2019
एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, जो पर्यंत हे जग आहे, तोपर्यंत आम्ही या देशाचेच नागरिक असू. आम्ही भलेही नसू, मात्र येणाऱ्या पिढ्यांना सांगू की, ज्या जागेवर 500 वर्ष मशिद होती, त्याला 6 डिसेंबर 1992 ला संघ परिवाराने पाडले आणि सर्वोच्च न्यायालयाला चुकीची माहिती दिली. मशिद हा काही जमिनीचा व्यवहार नाही. मी माझ्या घराचा व्यवहार करतो, मात्र मशिदच्या जमिनीचा व्यवहार केला जाऊ शकत नाही.
#WATCH "It is a historic and landmark judgement," says Defence Minister Rajnath Singh on #AyodhyaJudgment pic.twitter.com/0hKNBV79Co
— ANI (@ANI) November 9, 2019
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, हा ऐतिहासिक निर्णय आहे. मी नागरिकांना आवाहन करतो की, शांती कायम ठेवा.
#WATCH Uma Bharti,BJP on #AyodhyaVerdict: Court ne ek nishpaksh kintu divya nirnaya diya hai. Main Advani ji ke ghar mein unko maatha tekne aayi hoon, Advani ji hi veh vyakti the jinhone pseudo-secularism ko challenge kiya tha…unhi ki badaulat aaj hum yahan tak pahunche hain. pic.twitter.com/YYtY4RCz06
— ANI (@ANI) November 9, 2019
भाजप नेत्या उमा भारती म्हणाल्या की, न्यायालयाने निष्पक्ष निर्णय दिला आहे. मी आडवाणी यांच्या घरी त्यांच्या पाया पडायला जाईल. आडवाणी हे तेच व्यक्ती आहेत, ज्यांनी छद्म-धर्मनिरपेक्षतेला आव्हान दिले.
Baba Ramdev: This is a historic verdict. A grand Ram temple will be built. Decision to allot alternate land to Muslim side is welcome, I believe Hindu brothers should help in the construction of the Masjid as well. #Ayodhyajudgement pic.twitter.com/wcijPEkQ2Q
— ANI (@ANI) November 9, 2019
रामदेव बाबा यांनी देखील या निर्णयाचे स्वागत केले आहे.
सुप्रीम कोर्ट ने अयोध्या मुद्दे पर अपना फैसला सुना दिया है। कोर्ट के इस फैसले का सम्मान करते हुए हम सब को आपसी सद्भाव बनाए रखना है। ये वक्त हम सभी भारतीयों के बीच बन्धुत्व,विश्वास और प्रेम का है।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 9, 2019
याशिवाय काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी देखील न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करत शांती कायम ठेवण्याचे आवाहन केले आहे.
#AYODHYAVERDICT #RamMandir #AyodhyaJudgment pic.twitter.com/Lgy2JapDZD
— Raj Thackeray (@RajThackeray) November 9, 2019
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील आजचा दिवस आनंदाचा असून, कारसेवकांचे बलिदान सार्थक झाल्याचे म्हटले.
अन्य काही प्रतिक्रिया –
#AYODHYAVERDICT काही तासांतच अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे. याप्रकरणी काहीही निकाल आला तरी आपण सर्वांनी संयम राखावा, शांतता व सौहार्द राखावे. कोणत्याही अफवेला बळी पडू नये ही नम्र विनंती.
— Supriya Sule (@supriya_sule) November 9, 2019
जय श्री राम!
— Aaditya Thackeray (@AUThackeray) November 9, 2019
— Nitish Kumar (@NitishKumar) November 9, 2019
महाराष्ट्राने नेहमीच शाहू, फुले, आंबेडकर यांचा सहिष्णुता, सर्वधर्मसमभावाचा वारसा जपला आहे. आज सर्वोच्च न्यायालयात अयोध्या प्रकरणाचा जो निकाल येईल तो आदरपूर्वक स्वीकारला पाहिजे. आपल्या सर्वसमावेशक संस्कृतीला धक्का लागणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन करतो.#AYODHYAVERDICT
— Sunil Tatkare (@SunilTatkare) November 9, 2019