1 डिसेंबरपासून प्रवास करताना फास्टॅगसोबत ठेवणे अनिवार्य


नवी दिल्ली – येत्या 1 डिसेंबरपासून राष्ट्रीय महामार्गांवरुन प्रवास करताना वाहनचालकांना आता फास्टॅगसोबत ठेवणे अनिवार्य करण्यात येणार आहे. तर रोख रक्कमेच्या माध्यमातून आता डिसेंबर महिन्यापासून टोल नाक्यावर टोल स्विकारला न जाता तो फास्टॅगच्या माध्यमातून घेतला जाणार असल्यामुळे फास्टॅग घेणे चार चाकींसह अन्य वाहनांना सुद्धा अनिवार्य आहे आणि तो त्यांनी बसवून घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. हा नवा नियम लागू होईल, असे महामार्ग प्राधिकरण प्रकल्प संचालक संजय कदम यांनी म्हटले आहे. फास्टटॅग बारकोड सर्व वाहनचालकांना मिळावा यासाठी देशभरातील 800 पेट्रोल पंपांचा वापर प्रभावीपणे करण्यात येणार आहे. तर आता आम्ही तुम्हाला फास्टॅगमुळे होणारे फायदे व फास्टॅगबद्दल माहिती सांगणार आहोत.

फास्टॅग हा एकप्रकारचा बारकोड स्टिकरच असून जो वाहनांवर लावले जाईल. तुमचा कोड बँक खाते किंवा पेटीएम खात्याशी यात लिंक केलेले असेल. तुम्ही टोल नाक्यावर आजवर गाडी थांबवून टोल भरत होतात. पण तुम्हाला आता रोख पैसे देण्याची गरज नाही. फास्टॅगयुक्त वाहने टोलच्या एंट्री गेटवर जाताच गेटवरील सेन्सर फास्टॅग स्कॅन करून त्याची माहिती कंट्रोल रूमला देतो. ऑनलाइन टोल भरून बॅरिअर उघडले जाते. ज्यामुळे वाहनचालकांचा वेळ वाचणार आहे.

Leave a Comment