श्री श्री रविशंकर यांना पाककडून कर्तारपूर कॉरिडॉर उद्घाटन समांरभाचे आमंत्रण


नवी दिल्ली – भारत-पाकिस्तान दरम्यान जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्यात आल्यानंतर तणावाचे वातावरण आहे. उद्या ९ नोव्हेंबरला कर्तारपूर कॉरिडॉरचे उद्घाटन पाकिस्तान करणार आहे. आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांना पाकिस्तानने या उद्घाटन समांरभाचे आमंत्रण दिले आहे.

पाकिस्तानने त्याचबरोबर नवज्योत सिंह सिद्धू यांना आमंत्रण दिले असून नवज्योत यांनी परराष्ट्र मंत्रालयाकडे पाकिस्तानला जाण्यासाठी परवानगी मागितली आहे. सिद्धु यांना परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानला जाण्याची परवानगी दिली आहे. तसेच भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरैशी यांनी प्रमुख पाहूणे म्हणून आमंत्रण दिल्याचे सांगितले होते. पण मनमोहन सिंग यांनी यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. तर आता पाकिस्ताने श्री.श्री रविशंकर यांना कर्तारपूर कॉरिडॉरचे उद्घाटन समांरभामध्ये उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले आहे.

पाकिस्तानातील नुरवाला जिल्ह्यामध्ये शीखांचे पवित्र धर्मस्थळ गुरुद्वारा दरबार साहीब असून, भारत पाकिस्तान सीमेपासून ४ कि.मी. पाकिस्तानच्या हद्दीत आहे. गुरुनानक यांनी या ठिकाणी १८ वर्षे वास्तव्य केले असून, त्यांनी अखेरचा श्वासही याच ठिकाणी घेतला. हे पवित्र ठिकाण फाळणीनंतर पाकिस्तानात गेल्याने भारतातील शीख धर्मीयांना या ठिकाणी जाण्यास अडचणी येत होत्या. गुरुनानक यांच्या ५५० व्या जयंती निमित्त कर्तारपूर कॉरिडॉरचे उद्धाटन करण्यात येणार असून, नोव्हेंबरमध्ये ही सेवा सुरू होणार आहे. मागील वर्षापासून भारत व पाकिस्तान या प्रकल्पावर चर्चा करत होते.

Leave a Comment