नवी दिल्ली – राजधानी दिल्ली सध्या वायुप्रदुषणाच्या भयंकर समस्येचा सामना करत असतानाच त्याच पार्श्वभूमीवर दिल्लीतील सत्ताधारी केजरीवाल सरकारने गाड्यांची सम-विषय प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला असून रस्त्यावर ‘सम’ तारखेला ‘सम’ क्रमांकाच्या गाड्या धावतील तर, ‘विषम’ तारखेला ‘विषम’ क्रमांकाच्या गाड्या धावतील. ही प्रणाली आजपासून लागू झाली असून आज ४ तारीख असल्याने ‘सम’ क्रमांकाच्या गाड्या रस्त्यावर चालवण्याची परवानगी राहील.
नमस्ते दिल्ली! प्रदूषण कम करने के लिए आज से Odd Even शुरू हो रहा है। अपने लिए, अपने बच्चों की सेहत के लिए और अपने परिवार की साँसों के लिए Odd Even का ज़रूर पालन करें। कार शेयर करें। इस से दोस्ती बढ़ेगी, रिश्ते बनेंगे, पेट्रोल बचेगा और प्रदूषण भी कम होगा।
दिल्ली फिर कर दिखायेगी
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) November 4, 2019
याबाबतची माहिती देणारे ट्विट मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले आहे. ‘नमस्ते दिल्ली! प्रदूषण कमी करण्यासाठी आजपासून सम-विषम प्रणाली सुरू होत असून स्वतःसाठी आणि आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी तसेच, कुटुंबियांच्या श्वासासाठी सम-विषम प्रणालीचे नक्की पालन करावे. आपल्या चारचाकी इतरांसोबत शेअर करा. यामुळे मैत्री वाढेल, नवी नाती नयार होतील, पेट्रोल वाचेल आणि प्रदूषणही कमी होईल. दिल्ली पुन्हा एकदा करून दाखवेल, असे ट्विट केजरीवाल यांनी केले आहे.