टपाल खात्यात तब्बल ३६५० पदांसाठी मेगाभरती, शिक्षण केवळ १०वी पास


मुंबई: तब्बल ३६५० जागांसाठी महाराष्ट्र पोस्टल सर्कलमध्ये भरती प्रक्रिया होत आहे आणि या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट केवळ १०वी पास इतकीच आहे. याबद्दलची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत जी तुम्ही काळजीपूर्वक वाचा आणि या पदांसाठी अर्ज करा.

या पदासाठी होत आहे भरती – ग्रामीण डाक सेवक

  1. पदांची एकूण संख्या – ३६५०
  2. अर्ज भरण्याची शेवटची तारीख – ३० नोव्हेंबर २०१९
  3. वयोमर्यादा – अर्जदार उमेदवाराचं वय कमीत कमी १८ वर्षे आणि अधिकाधिक ४० वर्षांच्या दरम्यान असावे. एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत ५ वर्षांपर्यंत वयाची अट शिथिल करण्यात आलेली आहे. इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३ वर्षांपर्यंत वयाची अट शिथिल करण्यात आली आहे.
  4. शैक्षणिक अर्हता – इच्छुक आणि पात्र उमेदवार हा १०वी पास असावा. कम्प्युटरचे ज्ञान आवश्यक आहे. अर्जदाराला स्थानिक भाषेचे (मराठी) ज्ञान आवश्यक आहे.

पगार – १०,००० ते १४,५०० रुपये

  1. परीक्षा फी – सर्वसाधारण प्रवर्ग, इतर मागासवर्गीय प्रवर्ग आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा फी १०० रुपये इतकी आहे. तर एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना परीक्षा फी द्यावी लागणार नाही.
  2. अर्ज करण्याची प्रक्रिया – ऑनलाईन पद्धतीने इच्छुक उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज सादर करावा. त्यासाठी उमेदवाराला आपला उमेदवारी अर्ज https://indiapost.gov.in किंवा http://appost.in/gdsonline या वेबसाईटवर आपला उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. अर्जापूर्वी उमेदवाराला नाव नोंदणी करावे लागणार आहे. अर्ज नोंदणीची तारीख १ नोव्हेंबर २०१९ पासून ते ३० नोव्हेंबर २०१९ पर्यंत असणार आहे.

Leave a Comment