सौरव गांगुलीच्या निर्णयामुळे युवा क्रिकेटपटू होणार मालामाल


नवी दिल्ली : युवा खेळाडूंना भारतीय क्रिकेट बोर्डाच्या नवा अध्यक्ष सौरव गांगुलीने मोठे गिफ्ट दिले आहे. अध्यक्षपदाचा कारभार सौरव गांगुलीने स्विकारताच क्रिकेटपटूंसाठी वेगवेगळे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. गांगुलीने याआधी भारत-बांगलादेश यांच्यात दिवस-रात्र कसोटी सामन्यांचा प्रस्ताव ठेवला आहे. दरम्यान आता गांगुलीने युवा खेळाडूंसाठी मोठे पाऊल उचलले आहे.

लवकरच प्रथम श्रेणीमध्ये क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंकरिताही बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली करार करणार आहे. या खेळाडूंना या करारा अंतर्गत पगार किंवा फी मिळणार आहे. युवा खेळाडूंना नव्या व्यवस्थेनुसार वित्तीय सुरक्षा देण्याचा निर्णय गांगुलीने घेतला आहे. यासंबंधी गांगुलीने प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंनाही वेगवेगळ्या समस्या असतात. त्याचबरोबर खेळाडूंनी फी वाढवण्याची मागणी केली आहे. ज्या श्रेणीमध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडूंना मानधन दिले जाते, तसाच प्रकार प्रथम श्रेणीमध्ये होणार असल्याचे सांगत युवा खेळाडूंना मालामाल करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रथम श्रेणीमध्ये कराराची व्यवस्था करणार असल्याचे बीसीसीआयचे अध्यक्ष गांगुली यांनी सांगितले आहे. हे करार करण्याचे वित्त समितीला सांगितले असल्याचे गांगुली यांनी सांगितले. याबाबत दिवाळीनंतर निर्णय घेण्यात येईल, त्यानुसार खेळाडूंना मानधन दिले जाणार आहे. प्रथम श्रेणीमध्ये खेळाडूंना सध्या वर्षाला 25-30 लाख रुपये मिळतात. यात खेळाडूंनुसार 35 हजार दिवसाला दिले जातात. आता खेळाडूंची विभागणी केल्यानंतर त्यांचे मानधन ठरवले जाणार आहे. आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यासाठी भारताकडून करार करण्यात आले आहे. बीसीसीआयच्या वतीने सध्या ए प्लस, ए, बी, आणि सी असे करार केले आहेत. यानुसार खेळाडूंना मानधन दिले जाते. या श्रेणींमध्ये असलेल्या खेळाडूंना अनुक्रमे 7 कोटी, 5 कोटी, 3 कोटी आणि 1 कोटी रुपये वर्षाला मिळतात.

इडन गार्डन्स मैदानावरून भारतीय क्रिकेट संघाच्या गुलाबी पर्वाची सुरुवात होण्याची शक्यता आहे. हे गुलाबी पर्व म्हणजे दुसरे तिसरे काही नसून इडन गार्डन्सवर भारतीय संघ आपला पहिला डे/नाईट कसोटी सामना खेळण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बांगलादेश क्रिकेट बोर्डाला 22 ते 26 नोव्हेंबर या काळात इडन गार्डन्सवर होणारा सामना डे/नाईट प्रकारात खेळण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार आम्ही यावर काम करत आहोत. पण बीसीसीआयच्या या प्रस्तावावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

Leave a Comment