राष्ट्रवादीला सत्ता स्थापनामध्ये रस नाही : प्रफुल पटेल


मुंबई – महायुतीच्या बाजूने महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूकीचा निकाल लागला असला तरी ‘इस बार 220 के पार’ चा नारा भाजपने दिला होता, पण अपेक्षेप्रमाणे स्प्ष्ट बहुमत त्यांना न मिळाल्याने सत्ता स्थापनेसाठी आता विविध पर्यायांचा विचार होऊ शकतो. शिवसेना यामध्ये भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी सोबत येऊन सत्ता स्थापनेसाठी विचार करणार का? अशी चर्चा सुरू होती. पण या चर्चांना राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेल यांनी पूर्ण विराम लावला आहे. एका या वृत्त संस्थेशी बोलताना त्यांनी, सत्ता स्थापनेमध्ये राष्ट्रवादीला रस नाही विरोधी पक्षाची भूमिका आम्ही प्रभावी बजावू, असे म्हटल्यामुळे शिवसेना आणि भाजप काय सत्ता स्थापनेसाठी काय राजकीय समीकरणे जुळवणार? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

विधानसभा निवडणूक शिवसेना आणि भाजपने एकत्र मिळून लढली आहे. यामध्ये शिवसेनेला 56 तर भाजपला 105 जागा मिळाल्या आहेत. महाराष्ट्रात 288 विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक पार पडली. सत्ता स्थापनेसाठी 145 ची मॅजिक फिगर गाठायची आहे. पण महायुतीमध्ये शिवसेनेने 50-50 चा फॉम्युला राखत समसमान वाट्याची मागणी रेटून धरल्यास काय होणार? हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

विधानसभेच्या निकालानंतर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ता स्थापनेदरम्यान समसमान वाटपामध्ये मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षांसाठी दावा सांगण्यात काहीच चुकीचे नसल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. आज शरद पवार यांनी बारामतीमध्ये कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली आहे.

Leave a Comment