अफ्रिकेला व्हाईटवॉश देत टीम इंडियाची १० विश्वविक्रमांना गवसणी


नवी दिल्ली – दक्षिण आफ्रिका विरुद्ध ३ सामन्यांची कसोटी मालिकेत भारताने ३-० असे निर्भेळ यश संपादन केले. दरम्यान, भारतीय संघाने या मालिकेत फलंदाजीबरोबर गोलंदाजीतही सर्वश्रेष्ठ कामगिरी केली. विशेष म्हणजे, तब्बल दोन सामन्यात आफ्रिकेला फॉलोऑन देत भारताने दोन कसोटी सामने डाव राखून जिंकले. दरम्यान, टीम इंडियाने या मलिकेत तब्बल १० विश्वविक्रमांना गवसणी घातली आहे.

सलामीवीर रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तीनही (कसोटी, एकदिवसीय आणि टी-२०) प्रकारात सलामीवीर म्हणून खेळताना शतक झळकावले आहे. पहिल्या कसोटीत शतकी खेळी केल्यानंतर रोहित असा कारमाना करणारा जगातील पहिला खेळाडू आहे.
https://www.newdelhitimes.com/wp-content/uploads/2019/10/AP19294202614169.jpg
रविंद्र जडेजाने विशाखापट्टणमच्या कसोटी सामन्यात आपल्या कारकिर्दीतील २०० विकेटचा टप्पा पार केला. विशेष म्हणजे, कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद २०० विकेट जडेजाने घेतल्या असून हा एक विश्वविक्रम आहे. दरम्यान, सर्वाधिक जलद २०० विकेट घेण्याचा विक्रम श्रीलंकेच्या रंगना हेरथच्या नावे होता.

रोहित शर्माने विशाखापट्टणम येथे खेळवण्यात आलेल्या कसोटी सामन्यात १३ षटकार ठोकत, एका सामन्यात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थान पटकावले. हा विक्रम यापूर्वी पाकिस्तानचा वसीम अक्रमच्या नावे होता. रोहितने तो विक्रम मोडित काढला.

पहिल्याच सामन्याच्या दोनही डावात कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून प्रथमच मैदानात उतरलेल्या रोहित शर्माने शतकी खेळी केली. रोहित असा कारमाना करणारा जगातील पहिला खेळाडू आहे. सलामीवीराच्या पदार्पणाच्या सामन्यात रोहितने पहिल्या डावात १७६ तर दुसऱ्या डावात १२७ धावांची खेळी केली होती.

फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने आफ्रिकेविरुध्दच्या मालिकेत आपल्या कारकिर्दीत ३५० वा गडी बाद केला. विशेष म्हणजे, सर्वधिक जलद ३५० विकेट घेण्याचा टप्पा पार करत अश्विनने श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे.

विराट कोहलीने टेस्ट क्रिकेटमध्ये खेळताना कारकिर्दीतील १९ वे शतक झळकावले आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगच्या विक्रमांशी बरोबरी साधली.

विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार या नात्याने तब्बल ९ वेळा १५०+ धावा करत सर डॉन ब्रँडमनला मागे टाकले.

आफ्रिकेविरुध्दची मालिका जिंकत भारतीय संघाने मायदेशात सलग ११ मालिका जिंकण्याचा विश्वविक्रम केला. हा विक्रम यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या नावे होता. मायदेशात त्यांनी १० मालिका जिंकल्या होत्या.

संपूर्ण मालिकेत रोहित शर्माने १९* षटकार ठोकत वेस्ट इंडीजच्या शिमरोन हेटमेयरचा विक्रम मोडला. २०१८ मध्ये बांगलादेश विरुध्दच्या मालिकेत हेटमेयरने १५ षटकार ठोकले होते.

Leave a Comment