भारतीय रेल्वेने भंगार विकून कमवले कोट्यवधी रुपये


मुंबई : जगातील सर्वाधिक व्यस्त मानल्या जाणाऱ्या भारतीय रेल्वे मंत्रालयाच्या खात्यात एक मोठी धनराशी जोडली गेली आहे. सर्वांनाच ज्याचा स्त्रोत थक्क करुन जात आहे. रेल्वे मंत्रालयाच्या खात्यात जोडल्या गेलेल्या कोट्यवधी रुपयांचा आकडा आरटीआय अहवालाला उत्तर देत प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीतून समोर आला आहे.

प्रसिद्ध करण्यात आलेल्या या माहितीनुसार विविध प्रकारच्या भंगारची गेल्या १० वर्षांमध्ये विकण्यात आलेल्या भंगार विक्रीविषयी करण्यात आलेल्या निरीक्षणानुसार २००९- १० आणि २०१८- १९ या कालावधीत विक्री करुन या विभागाने तब्बल ३५ हजार ०७३ कोटी रुपये कमवले आहेत. या भंगारमध्ये कोच, वॅगन्स आणि रुळांचा समावेश आहे.

रेल्वे रुळांपासूनच्या भंगारची विक्री पाहता एक गोष्ट स्पष्ट होत आहे की २००९- १० पासून २०१३- १४ या पाच वर्षांच्या तुलनेत २०१४- १५ ते २०१८- १९ या वर्षांमध्ये रेल्वे रुळांपासूनच्या टाकाऊ वस्तूंचे प्रमाण कमी झाले असल्यामुळे गेल्या पाच वर्षांमध्ये रेल्वे रुळांमध्ये झालेल्या बदलांचे प्रमाण कमी होते, ही बाबही समोर आली आहे. भंगारच्या विक्रीतून सध्याच्या घडीला झालेल्या कमाईचे हे आकडे सर्वांना थक्क करत असल्यामुळे भारतीय रेल्वे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

Leave a Comment