नवी दिल्ली – देशात सध्या शारदीय नवरात्र उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरु झाला आहे. या उत्सवात सर्व जाती-धर्माचे लोक गरबा खेळतात. पण एक अजब फतवा हैदराबादच्या बजरंग दल दांडिया उत्सव मंडळाने काढलेला आहे. या संघटनेने गैर-हिंदूंना ओळखण्यासाठी गरबा खेळायला येताना आधार कार्ड सोबत घेवून यावे, असे म्हटले आहे.
बजरंग दल नवरात्र उत्सवाला जातीय रंग देण्याचे काम करत असल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. फक्त हिंदुनाच बजरंग दलाकडून आयोजित गरबा कार्यक्रमात प्रवेश मिळणार आहे. या कार्यक्रमात हिंदु व्यतिरिक्त कोणत्याही धर्मातील लोकांना बजरंग दलाला स्थान द्यायचे नसल्यामुळे बजरंग दलावर टीका होत आहे.