दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह कसोटी संघातून बाहेर


नवी दिल्ली : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या टी-20 मालिकेनंतर या दोन्ही संघात 2 ऑक्टोबरपासून कसोटी मालिका होणार आहे. भारतीय संघाला तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेआधीच मोठा धक्का बसला आहे. कसोटी मालिकेतून भारताचा स्टार जलद गोलंदाज आणि हुकुमी एक्का जसप्रीत बुमराह याने माघार घेतली आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेविरोधात होणार असलेल्या कसोटी मालिकेतून पाठीला झालेल्या दुखापतीमुळे माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

कसोटी मालिकेतून बुमराहने माघार घेतल्यामुळे जलद गोलंदाज उमेश यादवला आता संघात सामिल करण्यात आले आहे. 2 ऑक्टोबरला विशाखापटण्णम येथे भारताचा पहिला कसोटी सामना होणार आहे.

भारताचा कसोटी संघ- विराट कोहली, मयंक अग्रवाल, रोहित शर्मा, चेतश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत, वृध्दीमान साह, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, इशांत शर्मा, शुभमन गील.

Leave a Comment