आफ्रिदीने शोधले पाकमध्ये लंकेच्या खेळाडूंचा देशात न खेळण्यामागचे फालतू कारण


नवी दिल्ली – आपल्या वाकड्या तिकड्या वक्तव्यामुळे पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी नेहमीच चर्चेत असतो. तो यावेळीही एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. श्रीलंकेच्या काही क्रिकेटपटूंनी आगामी पाकिस्तानच्या दौऱ्यासाठी पाकचा दौरा न करण्याचे ठरवले होते. आता आफ्रिदीने या खेळाडूंनी पाकिस्तानात जाण्यास का मनाई केली याचे कारण शोधले आहे.

या प्रकरणासंबंधी आफ्रिदीने इंडियन प्रीमियर लीग (आईपीएल) स्पर्धेला जबाबदार ठरवले आहे. लंकेच्या खेळांडूवर आयपीएल दबाव टाकत असल्यामुळे ते पाकिस्तानात खेळण्यास टाळाटाळ करत असल्याचे आफ्रिदीने म्हटले आहे. आफ्रिदी पुढे म्हणाला, लंकेच्या खेळांडूशी मी आधी चर्चा केली होती. हे सर्व खेळाडू तेव्हा पीएसएलमध्ये खेळण्यास तयार होते. पण तुम्ही जर पाकिस्तानात गेलात तर आम्ही तुमच्यासोबत करार करणार नाही असे आयपीएलकडून त्यांना सांगण्यात आले आहे.

नेहमीच लंकेच्या खेळाडूंचे पाकिस्तानने समर्थन केले आहे. त्यांच्यावर लंकेच्या क्रिकेट बोर्डानेही पाकिस्तानसोबत खेळण्याचा दबाव टाकला पाहिजे. लंकेचे खेळाडू येथे आले तर इतिहासात नेहमीत त्यांचे नाव घेतले जाईल. असेही आफ्रिदी म्हणाला आहे. तत्पूर्वी पाकिस्तानचे मंत्री फवाद हुसैन चौधरी यांनीही असाच आरोप केला होता. श्रीलंका कराची आणि लाहोरमध्ये तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामने खेळणार आहे.

Leave a Comment