नरेंद्र मोदीच छत्रपती शिवरायानंतरचे जाणते राजे – हंसराज अहिर


वर्धा – माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी वर्धायेथील बॅचलर रोडवरील सावरकरांच्या पुतळ्याच्या भूमीपूजनाप्रसंगी पत्रकारांशी बोलताना छत्रपती शिवरायांनंतर देशाचा खरा जाणता राजा कोण असेल तर ते नरेंद्र मोदीच असल्याचे म्हटले आहे.

महाराष्ट्राची जनता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जाणता राजा म्हणून ओळखते पण जनतेसाठी त्यांनी काय केले ते आता कळू लागले आहे. त्यांनी कुटुंबाचे भले करण्यापलिकडे कोणतीच कामे केली नाहीत. देशाचा, राज्याचा विकास आम्ही करीत अशल्याचे म्हणत त्यांनी शरद पवारांवर टीका केली. तर दुसरीकडे पंतप्रधानावर स्तुती सुमने उधळली.

सर्वांना जाणता राजा हा शब्द लागू होत नाही. आमचे नेते खरे जाणते राजे मंडळी आहेत. या देशाची गरज ओळखून देशाच्या विकासाची कामे प्रधानमंत्री मोदी यांनी हाती घेतली. मोदींनी देशाच्या सीमा रक्षणापासून, सुरक्षेपर्यंत, कृषीप्रधान देश आणि लोकसंख्या पाहून कामे हाती घेतली. छत्रपती शिवरायांनंतर देशाचा खरा जाणता राजा कोणी असेल तर ते नरेंद्र मोदी असल्याचे म्हणत माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी नरेंद्र मोदींची स्तुती केली. त्यांनी या देशाचे वैभव जगाला दाखवून दिले. असेही ते म्हणाले.

भाजपमध्ये सुरू असलेली मेगाभरती ही मोदींचे आकर्षण असल्याने होत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीतील मंडळी मोदी, फडणवीस यांची कार्यशैली पाहून भाजपमध्ये येत आहे. कोण कोणाला सोडत आहे याला महत्व नाही. पंतप्रधान मोदी यांची कार्यशैली पाहून हे लोक भाजपमध्ये येत असल्याचे मत त्यांनी हंसराज अहिर यांनी व्यक्त केले.

Leave a Comment